Ticker

6/recent/ticker-posts

"अबू आझमी निलंबित झाला पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे"; सतीश भाऊ हिवरकर

निषेध निषेध निषेध जाहीर निषेध 
मंगरूळ नाथ.
धर्मवीर संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाला चांगला प्रशासक म्हणणाऱ्या अबू आझमी चा मंगरूळनाथ नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोळेमार आंदोलन.


 अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कोतुक करत वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा प्रश्न करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असे अबू आझमी यांनी म्हटले होते. या विधानाचे पडसाद आज विधानसभेत बघायला मिळाले. 'अबू आझमींना निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगरूळनाथ नगरीतील हिंदू प्रेमींनी जुळेमार आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला याप्रसंगी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमाण करतो. आता हे खपवन घेतले जाणार नाही.

"छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमाण करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. 

सतीश भाऊ हिवरकर पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांवर ४० दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले, एवढा अपमाण केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमाण आहे. आपल्या देशभक्तीचा अपमाण आहे. मी एवढेच सांगतो, 

देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।"

याप्रसंगी सतीश भाऊ हिवरकर, पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, डॉक्टर संजय राऊत,नंदू पाटील  मुळे, कार्यकर्त्यांसह इत्यादींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला व जोळेमार आंदोलन केले. नारेबाजी करत, निषेध व्यक्त करण्यात आला 


Post a Comment

0 Comments