जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे म्हणाले की, बाबासाहेबांनी पत्रकारांना लिहीण्याचे स्वातंत्र्य दिले. याची जाणीव ठेवून पत्रकारांना आपल्या लेखणीतून वाईटावर आसूड ओढण्याचे काम केले पाहीजे. ग्रामीण भागातील लहान पत्रकारांना आजही अनेक त्रास व अडचणीचा सामना करावा लागतो. चांगली बातमी लिहीली तर कोणीही कौतूक करत नाही. मात्र विरोधात बातमी लिहीली तर त्याला त्रास दिल्या जातो. ग्रामीण भागातील या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या लेखणीला बळ दिले पाहीजे.
आजची पत्रकारीता ठराविक व्यवस्थेला वाहिलेली आहे
- विनोद तायडे
आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तायडे यांनी आज मुकनायकाची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, आजची पत्रकारीता काही ठराविक व्यवस्थेला वाहीलेली आहे. प्रथम हा कार्यक्रम करत असतांना अनेकांनी आमच्यावर टिका केली. मात्र या टिकेला घाबरुन आम्ही थांबलो नाही. पत्रकारीता हे बाबासाहेबांनी दिलेले हत्यार असून पत्रकार आपल्या लेखणीतून क्रांती घडवू शकते.
मुकनायक हे वृत्तपत्र शोषित समाजाला बोलके करणारे - सागर तायडे
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना जेष्ठ कामगार नेते सागर तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर, कामगार, शेतकरी आदी घटकासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, बाबासाहेबांनी कामगारांसाठी सुरु केलेले मुकनायक हे वृत्तपत्र शोषित समाजाला बोलके करणारे होते. या वृत्तपत्रातून त्यांनी विविध घटकाच्या समस्या प्राधान्याने मांडल्या. बॅरीस्टर झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सफाई कामगारांसाठी युनियनची स्थापना केली. स्वतंत्र मजदुर युनियन काढली. मात्र बाबासाहेबांकडून आपण काय शिकलो? याचा विचार केला पाहीजे. इमारत बांधकाम कामगार, गोदी कामगार, विटभट्टी कामगारांच्या समस्येवर त्यांनी प्रबंध सादर करुन पार्लमेंटमध्ये सादर केले. जेष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी लोकसत्ता मधील मार्मिक या सदरात लेख लिहील्यानंतर नामांतराची चळवळ सुरु झाली. इतकी ताकद पत्रकारीतेत आहे. आजही ९३ टक्के कामगारांची शासनदरबारी नोंदच नाही. कामगारांसाठी आलेला निधी आचारसंहितेच्या नावाखाली रोखून धरण्यात आला आहे. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत कामगारांच्या समस्या मांडल्या. घरकामगार, नाका कामगार, शेतमजूर, गिरणी कामगारांसाठी त्यांनी मोठा लढा दिला. सर्वाना मोफत शिक्षण मिळावे हा बाबासाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी मराठवाडयातील दुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या. एक जात एका धर्मासाठी त्यांनी कधीही कार्य केले नाही. त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते. पत्रकार ही मोठी शक्ती आहे. पत्रकार अधिकार्यांना प्रश्न विचारु शकतो. मात्र समाजाला जागृत करायचे असेल तर पत्रकारीतेच्या माध्यमातून प्रबोधन केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. त्यांनी काढलेले मुकनायक हे वृत्तपत्र प्रेेरणादायी व लक्षवेधी होते असे ते शेवटी म्हणाले. उपस्थितांचे आभार पप्पु घुगे यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हाभरातून विविध वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे व सोशल माध्यमांचे पत्रकार बहूसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष अनिल ताजने, आयोजन समिती मार्गदर्शक बबनराव खिल्लारे, सुनिल कांबळे, सुधाकर पखाले, राजाभाऊ इंगोले, आयोजन समिती अध्यक्ष विनोद तायडे, उपाध्यक्ष संतोष वानखडे, माणिकराव डेरे, रवी अंभोरे, विनोद डेरे, बंडू इंगोले, किरण पखाले, कार्याध्यक्ष पप्पू घुगे, सचिव राजकुमार पडघान, कोषाध्यक्ष संदीप डोंगरे, प्रसिद्धीप्रमुख ज्योती इंगळे, सदस्य अजय ढवळे, संजय खडसे, भारत कांबळे, नाना देवळे, श्रीकृष्ण खिल्लारे, संतोष कांबळे, नागेश अवचार, पूजा बनसोड, किरण पडघाण आदींनी अथक परिश्रम घेतले. शेवटी सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments