कारंजा तालुक्यातील गायवळला स्मार्ट ग्रामचा प्रथम पुरस्कार
जिल्हयातील 6 गावांना मिळाले स्मार्ट ग्राम पुरस्कार
विभागीय वर्हाडी जत्रेचा हजारो महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ
वाशिम – महिला बचतगटांनी मोठी झेप घेतली असून या बचत गटांचे चांगले मार्केटींग झाले आहे. बचत गटाच्या या कार्यामुळे वाशिम जिल्ह्याचा देशात नावलौकीक झाला असून आपला जिल्हा देशात दुसरा क्रमांकावर असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी केले आहे.विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वाशिमच्या संयुक्त विद्यमाने आज 18 मार्च रोजी स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलात विभागातून आलेल्या महिलांच्या भरगच्च उपस्थितीत महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थाच्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री अर्थात वर्हाडी जत्रेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, जि.प. सिईओ श्रीमती वसुमना पंत, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, जि.प. सदस्य पांडूरंग ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधिश विजय टेकवाणी, अमरावती विभाग उपायुक्त राजीव फडके, प्रमोद लळे, अति. मुकाअ सुनिल निकम, उमेदचे प्रकल्प संचालक किरण कोवे, कारंजा पं.स. सभापती प्रदीप देशमुख, उपमुकाअ गजानन वेले, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता खारोळे, उपमुकाअ पंचायत डिगांबर लोखंडे, कृषी अधिकारी बंडगर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर बंजारा महिला भगिनींनी आपल्या पारंपारीक वेशभूषेत आणि बोलीभाषेत अप्रतीम असे नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविकातून बोलतांना मुकाअ श्रीमती वसुमना पंत म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे महिलांचे विभागीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यात अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिमजिल्हयातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महिलांना स्वत: उत्पादीत केलेल्या वस्तुुंच्या विक्रीसाठी सशक्त व्यासपीठ मिळाले असून या महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात प्रदर्शनीला भेट देवून वस्तुंची खरेदी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्रीमती पंत यांनी वर्ष 2022-23 मध्ये बचत गटासाठी शासनाने दिलेले उद्दीष्ट फेब्रुवारी मध्येच पुर्ण केले असून बचतगटांना फिरत्या निधीचेही वाटप केल्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन चाफेश्वर गांगवे यांनी तर आभार प्रदर्शन उमेदचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी मानले. या कार्यक्रमाला विभागातील पाचही जिल्ह्यातून महिलांची भरगच्च उपस्थिती लाभली.
0 Comments